टीम लय भारी
मुंबई: खासदार सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह तुळजापूरच्या तुळजा भवानीचे दर्शन घेतले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील मुख्यमंत्री होऊ दे. संपूर्ण पक्ष घेऊन तुळजा भवानी मातेच्या दर्शनाला येईन, असा नवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अंबाबाईच्या चरणी केला.
यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. या सगळ्यावर मनसे (MNS) नेते गजानन काळे यांनी महाविकास आघाडी सरकारावर जोरादर टीका केली आहे. त्यांनी ट्विट कर असे म्हटले की,
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विधानावरून भविष्यात त्यांना सेनेचा मुख्यमंत्री नको असे चित्र दिसतंय.
गजानन किर्तीकर,खासदार संजय जाधव,श्रीकांत शिंदे व इतर सेना नेते राष्ट्रवादीबद्दल उघड नाराजी बोलून दाखवू लागले आहेत.
लाचार संजय राऊत तरी राष्ट्रवादीची तळी उचलण्यात मग्न आहेत#लाचारसेना— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 31, 2022
पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार – विश्वप्रवक्ते संजय राऊत
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होऊ दे ,नवस फेडणार- सुप्रिया सुळे
मग काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार ???😅— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 31, 2022
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विधानावरून भविष्यात त्यांना सेनेचा मुख्यमंत्री नको असे चित्र दिसतंय. गजानन किर्तीकर,खासदार संजय जाधव,श्रीकांत शिंदे व इतर सेना नेते राष्ट्रवादीबद्दल उघड नाराजी बोलून दाखवू लागले आहेत. लाचार संजय राऊत तरी राष्ट्रवादीची तळी उचलण्यात मग्न आहेत #लाचारसेना
पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार – विश्वप्रवक्ते संजय राऊत पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होऊ दे ,नवस फेडणार- सुप्रिया सुळे मग काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार ???
मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला लाचारसेना म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिवसनेचे खासदार संजय राऊतांवर ही निशाना साधला आहे.
हे सुद्धा वाचा:
जे लोक द्वेषाने बोलतात त्यांना अहिल्यादेवींचा विचारच कळला नाही : रोहित पवार
Union Minister’s Mumbai House Gets Show Cause Notice Over Coast Norms Violation